‘लोकसंधान’ ने पार केला तेवीस दिवसात १ लक्ष वाचकांचा टप्पा
सत्य, विश्वासार्ह, प्रबोधनात्मक ई – बातम्यांना वाचकांचा भरघोस प्रतिसाद !
श्रद्धा जोशी.
निरा, ता. २६ :
‘लोकसंधान’ या ई न्यूजसेवेद्वारे प्रकाशित सत्य, वस्तुनिष्ठ, रोखठोक आणि प्रबोधनात्मक बातम्यांना अल्पावधीतच हजारो वाचक, दर्शकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वाचकांच्या प्रेमाच्या बळावर ‘लोकसंधान’ने अवघ्या तेवीस दिवसात १ लक्ष वाचकांचा टप्पा पूर्ण केला.
पुरंदर तालुक्यातून सुरु झालेल्या या ई न्यूज सेवेला वाचक, दर्शकांची सुंदर साथ मिळाली. दत्त जयंती (ता. ०४) डिसेंबर पासून या ई वार्तांची सुरुवात झाली होती. विविध सामाजिक विषयांना हात घालत लोकसंधानने अनेक समस्या पुढे आणल्या. सत्य, दर्जेदार बातम्यांनी वाचकांना आकृष्ट केले. त्यामुळे तेवीस दिवसात हा टप्पा लोकसंधानला गाठता आला.
“वाचकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला कायम अबाधित ठेऊन यापुढेही सत्यता व विश्वासार्हता जपली जाईल. परखड व रोखठोक, सडेतोड लेखन हा पत्रकारितेचा एक भाग असतो. आपण आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व दर्शक, वाचकांचे आभारी आहोत.”
– श्रद्धा जोशी, मुख्य संपादिका, लोकसंधान
“लोकसंधान मार्फत आम्ही सर्व घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘सर्वात जलद बातम्या’ देण्याऐवजी ‘सत्य, विश्वासार्ह’ बातम्या प्रसिद्ध करण्याकडे आमचा कल आहे. वाचकांनी अल्पावधीत लोकसंधानला भरभरून दिले. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि लोकसंधान परिवाराचे अभिनंदन.”
– राहुल शिंदे, कार्यकारी संपादक
“आम्ही पत्रकारितेची नितीमुल्ये पाळून समाजापर्यंत सत्य घटना पोहचवत आहोत. वाचकांनी दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी आनंददायक आहे.”
– निलेश काशीद, पत्रकार
“लोकसंधानचे विशेष म्हणजे कायद्यातील तरतुदींचे पालन करून पत्रकारितेतील नियम पालन करीत केलेले लेखन हे आहे. या ई न्यूजचा कायदा विभाग आमच्याकडे आहे. अल्पावधित वाचकांनी, दर्शकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.”
– ॲड. बापूसाहेब शिलवंत आणि ॲड. अमोल यादव.

